Full Width(True/False)

आजही मी सुशांतशी बोलत असते... अंकिता लोखंडेने व्यक्त केल्या भावना

मुंबई ः आणि दिवंगत अभिनेता सुशांतसिहं राजपूत हे सहा वर्ष रिलेशनमध्ये होते. २०१६ मध्ये त्यांचे ब्रेकअप झाले. अलिकडेच अंकिताने एका मुलाखतीमध्ये तिचे सुशांतबरोबर झालेले ब्रेकअपपासून ते त्याच्या मृत्यूनंतर झालेल्या गोष्टींवर मोकळेपणाने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तिने सांगितले की, सुशांतच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबासोबतच तिला आणि तिच्या कुटुंबाला खूप मोठा धक्का बसला होता. झालेल्या घटनेवर कुणाचाच विश्वासच बसत नव्हता. आजही सुशांतशी बोलते 'सुशांत आता या जगात नाही, या धक्क्यातून बाहेर यायलाच मला खूप दिवस लागले', असे सांगत अंकिता पुढे म्हणाली की, ' सुशांत कायमच माझ्यासोबत असेल. मी आता खूप नॉर्मल झाले आहे. परंतु गेल्या काही दिवसांमध्ये मी, माझे कुटुंब आणि सुशांतच्या कुटुंबाने खूप काही सहन केले आहे. त्याच्या अचानक जाण्यामुळे सर्वजण रडत होते. एक महिला माझ्याजवळ आली आणि सुशांतच्या आठवणी काढून रडू लागली. हे पाहून मला खूप भरून आले होते. ते पाहून मी सुशांतला म्हटले बघ लोकांचे तुझ्यावर किती प्रेम आहे. तुझ्या आठवणीं काढत ते रडत आहेत.. आजही कधी कधी मी सुशांतशी बोलते.' सुशांत गेल्यानंतरचा काळ खूपच कठीण होता सुशांतच्या मृत्यूनंतरच्या दिवसांबद्दल अंकिताला विचारले असता ती म्हणाली, 'कधीही भरून न येणारी जखम झाली आहे. सुशांत तर गेला तो आता कधीच परत येणार नाही. पण त्याचे अशा जाण्याची मी कधीच कल्पना केली नव्हती. त्यामुळे तो माझ्यासाठी खूप मोठा धक्का होता. त्यानंतर बरेच दिवस मी त्याच धक्क्यात होते. एकीकडे सुशांतच्या जाण्याचे दुःख होते तर दुसरीकडे मी त्याच्याबरोबर ब्रेकअप केले म्हणून लोक मलाच वाईट ठरवत होते. कारण सुशांत गेल्यानंतर मी काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती. मग मी सोशल मीडियावर सुशांतला श्रद्धांजली वाहण्यासाठी आरपीआय का नाही लिहिले याचा जाब मला विचारत होते. ' ते मी कधी लिहू शकत नाही त्याबद्दल अंकिता पुढे म्हणाली, ' मी कधीच सुशांतचा फोटो पोस्ट करत त्याच्यासाठी आरपीआय लिहू शकणार नाही. कारण माझ्यात इतकी हिंमतच नाही. परंतु याही गोष्टीवरून लोकांनी मला नावे ठेवायला सुरुवात केली. लोकांना नेमके माझ्याकडून काय अपेक्षित होते? आपल्या जवळची व्यक्ती कायमची निघून जाते तेव्हा त्याचा फोटो आपण टाकतो का? सुशांतच्या फोटो पोस्ट करत त्याच्यासाठी श्रद्धांजली वाहणारे शब्द लिहूच शकत नाही.' ब्रेकअप का झाले होते याच मुलाखतीमध्ये अंकिताने तिचे सुशांतबरोबर ब्रेकअप का झाले याचाही खुलासा केला. तिने सांगितले की, आयुष्यात सुशांतने करिअरला प्राधान्य दिले आणि तो पुढे निघून गेला. तो परत येईल या आशेवर ती खूप दिवस होती. पण तो परतला नाही. तो गेल्यानंतर दीड वर्ष खूप कठीण होते, असेही अंकिताने या मुलाखतीमध्ये सांगितले आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3shqX4a