Full Width(True/False)

कर्जबाजारी झालेल्या बिग बींनी यश चोप्रांकडे मागितलं होतं काम

मुंबई: संघर्ष हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग आहे आणि याचा सामना बॉलिवूडच्या सेलिब्रेटींनासुद्धा कधी ना कधी करावा लागला आहे. ७० च्या दशकापासून चित्रपट आणि टीव्ही शोमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आलेल्या महानायक याच्याही आयुष्यात असा संघर्षाचा काळ येऊन गेला आहे जेव्हा त्यांचे यशस्वी होण्याचे सर्वच मार्ग बंद झाले होते. बॉलिवूडचे दिग्गज कलाकार असूनही अमिताभ बच्चन यांच्यावर एक वेळ अशी आली होती जेव्हा त्यांना आर्थिक समस्यांचा समाना करावा लागला होता. ते कर्जबाजारी झाले होते आणि त्यांना चित्रपटांमध्ये काम मिळणंही जवळपास बंद झालं होतं. अशा अवस्थेत त्यांनी यांच्या घरी जाऊन त्यांच्याकडे काम मागितलं आणि एका चित्रपटानं त्याच्या आयुष्याला पुन्हा एकदा कलाटणी दिली. अमिताभ बच्चन यांचे चित्रपट हिट झाले होते आणि त्यांनी ९० च्या दशकात एबीसील नावाची एक कंपनी सुरू केली होती. त्यांना अपेक्षा होती की, ही कंपनी यशस्वी होऊन त्यांच्या समृद्धीला पुढे घेऊन जाईल. पण असं काही झालं नाही. या उलट या कंपनीमुळे अमिताभ बच्चन यांना कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं आणि ते कर्जबाजारी झाले. घरची आर्थिक परिस्थिती बिकट होत चालली होती. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अमिताभ यांचा मुलगा अभिषेक बच्चननं वडिलांच्या त्या कठीण काळाचा उल्लेख केला जेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला शिक्षण सोडून भारतात परतण्यास सांगितलं होतं. अभिषेक म्हणला, 'मी त्यावेळी बोस्टन युनिव्हर्सिटीमध्ये शिकत होतो. पण मी शिक्षण अर्धवट सोडलं कारण त्यावेळी माझे वडील आर्थिक समस्यांचा सामना करत होते आणि त्यावेळी मी त्यांची मदत करण्याएवढा मोठाही नव्हतो. तरीही मी थोडे प्रयत्न केलं आणि कंपनीमध्ये प्रोडक्शन बॉय म्हणून काम सुरू केलं.' अभिषेक पुढे म्हणाला, 'एका रात्री बाबा माझ्याकडे आले आणि मला म्हणाले, आता माझे चित्रपट चालत नाहीयेत आणि बिझनेस सुद्धा ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. काहीच ठीक होत नाहिये त्यामुळे मी आता पुन्हा एकदा अभिनय क्षेत्राकडे वळण्याचा निर्णय घेतला आहे. दुसऱ्या दिवशी ते यश चोप्रा यांच्या घरी गेले.' अमिताभ बच्चन यश चोप्रा यांच्याकडे गेले आणि त्यांना म्हणाले, 'हे पाहा माझ्याकडे काहीच काम नाही आणि आता कोणीच मला काम देतही नाही. माझे चित्रपट चालत नाहीत. त्यामुळे आता मी तुमच्याकडे काम मागण्यासाठी आलो आहे. मला तुमच्या चित्रपटात काम द्या.' यावेळी नायकाच्या भूमिकेसाठी अमिताभ बच्चन खूपच मोठे होते आणि नव्या अभिनेत्यांचा काळ सुरू झाला होता. यश चोप्रा यांनी अमिताभ बच्चन यांचा शब्द मानला आणि अमिताभ यांना घेऊन 'मोहब्बतें'ची निर्मिती केली. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबतच शाहरुख खान, ऐश्वर्या राय, उदय चोपड़ा, शमिता शेट्टी, किम शर्मा यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. पण या चित्रपटानं अमिताभ यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. त्यांना पुन्हा चित्रपटांसाठी विचारणा होऊ लागली. तसेच कौन बनेगा करोडपती या टीव्ही शोसाठी सुद्धा त्यांनी होकार दिला. लवकरच अमिताभ बच्चन 'चेहरे', 'झुंड' आणि 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटांमध्ये दिसणार आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3tCyA5U