Full Width(True/False)

बॉलिवूडचा कमनशिबी अभिनेता ज्याच्या इच्छा राहिल्या अपूर्ण

मुंबई- बॉलिवूड कलाकरांना प्रेक्षकांकडून कितीही प्रेम मिळालं तरीही त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात त्यांना अशा व्यक्तींची गरज असते ज्या त्यांना समजून घेतील. कलाकारांच्याही काही इच्छा असतात ज्या त्यांना पूर्ण करायच्या असतात. पण काही कारणांमुळे त्या पूर्ण होऊ शकतातच असं नाही. कधी त्यांचा स्वभाव त्यांच्या वाटेतील अडचण बनतो तर कधी नशीब त्यांना साथ देत नाही. बॉलिवूडचे स्टार अभिनेते यांच्यासोबतही असंच काहीसं झालं होतं. अभिनय क्षेत्रात प्रचंड नाव कमावलेल्या या अभिनेत्याला खऱ्या आयुष्यात प्रेम कधीही मिळालं नाही. त्यांना लोक बॉलिवूडचे ट्रॅजेडी किंग म्हणूनही ओळखतात. 'खिलौना' चित्रपटातून ओळख मिळवणाऱ्या या अभिनेत्याने अनेक हिट चित्रपटात काम केलं. त्यांना भाऊ मानणाऱ्या अभिनेत्री अंजु महेंद्र यांनी त्यांच्या एका मुलाखतीत संजीव यांच्या आयुष्याबद्दल सांगितलं होतं. त्यांच्या म्हणण्यानुसार, संजीव यांचं अफेअर अनेक अभिनेत्रींसोबत होतं पण ते नेहमीच त्यांच्यावर शंका घ्यायचे. त्यांना वाटायचं की त्या अभिनेत्री त्यांच्यावर नाही तर त्यांच्या पैशावर प्रेम करत आहेत. त्यांच्या या स्वभावामुळे त्यांचं लग्नही होऊ शकलं नाही. संजीव यांचं नाव त्यावेळच्या अनेक दिग्गज अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं. त्यांनी हेमा मालिनी यांच्याकडे लग्नाचा प्रस्ताव पाठवला होता. परंतु, त्यांनी दोन वेळा संजीव यांच्या प्रस्तावाला नकार दिला. त्यानंतर त्यांनी कोणत्याही मुलीला लग्नासाठी विचारणा केली नाही. याशिवाय त्यांची दुसरी इच्छा मुंबईमध्ये घर विकत घेण्याची होती. त्यांना वाटायचं की मुंबईत त्यांचा स्वतःचा बंगला असावा. परंतु, जेव्हा ते एखाद्या बंगल्यासाठी पैसे जमवायचे तेव्हा त्या बंगल्याची किंमत आणखी वाढायची. हा प्रकार अनेक वर्ष सुरू राहिला. त्यानंतर त्यांनी मुश्किलीने एक बंगला घ्यायचं ठरवलं होतं तेव्हा त्यांना कळालं की त्या जमिनीवर कोर्टाची केस सुरू आहे. त्यामुळे संजीव कधीही स्वतःचं घर खरेदी करू शकले नाहीत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2QP9GRT