Full Width(True/False)

माधुरीमुळे तुटलं होतं संजयचं लग्न, पत्नीला अमेरिकेत सोडून आलेला

मुंबई- बॉलिवूडमध्ये अनेक प्रेम कथा अशा आहेत ज्या कधी पूर्ण होऊ शकल्या नाहीत. काही कथांच्या फक्त प्रेक्षकांमध्ये चर्चा होत राहिल्या. त्यातील एक कथा बॉलिवूड अभिनेता आणि धकधक गर्ल यांचीही आहे. त्यांच्या प्रेमप्रकरणाची देखील त्याकाळी प्रचंड चर्चा झाली होती. संजयच्या आयुष्यावर बनलेला चित्रपट 'संजू' प्रदर्शित होण्यापूर्वीच त्यांनी १०८ मुलींना डेट केल्याची कबुली दिली होती. त्या मुली कोण होत्या हे तर संजू बाबाचं सांगू शकेल पण त्यातील एक माधुरी देखील होती. असंही म्हटलं जातं की ते दोघेही या नात्याबद्दल इतके गंभीर होते की ते लग्नदेखील करणार होते परंतु, संजय यांचं अगोदर लग्न झालं होतं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय माधुरीच्या मागे इतका वेडा झाला होता की अमेरिकेत कर्करोगाशी लढा देणाऱ्या पत्नीला एकटीला इस्पितळात सोडून भारतात परत आला होता. ही गोष्ट जेव्हा त्यांच्या पत्नीला ऋचा शर्माला कळाली तेव्हा ती देखील त्याच्या मागे भारतात परतली. ऋचाला घेण्यासाठी तो एअरपोर्टवरही गेला नव्हता अशाही त्यावेळी चर्चा होत्या. ऋचा यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, जेव्हा त्या मुंबईला परतल्या होत्या तेव्हा संजय त्यांच्यासोबत वाईट वागायचा. त्यानंतर त्या दोघांमधले संबंध कायमचे बिघडले. ऋचा यांच्या बहिणीने एना शर्माने त्यावेळी माधुरीवर आरोप करत म्हटलं होतं की, 'माधुरी हवं ते सगळं मिळवू शकते. हव्या त्या व्यक्तीसोबत संबंध ठेवू शकते पण अशा पुरुषासोबत संबंध कसे ठेवू शकते जो त्याच्या लग्नाच्या बायकोसोबत इतकं वाईट वागतो.' त्यानंतर जेव्हा मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटात संजयचं नाव आलं आणि जेव्हा ड्रग्ज प्रकरणात त्याचं नाव येऊ लागलं तेव्हा माधुरीने त्याच्यासोबतच सगळे संबंध तोडून टाकले होते. इतकंच नाही तर माधुरी दीक्षितने ती कधी संजय दत्तसोबत रिलेशनमध्ये होती, हे मान्य करायलाही नकार दिला होता.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/32yDa9w